....... *हेमंत करकरे - खरा देशभक्त* २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) हेमंत करकरे यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते. पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी मुंबई समुद्रकिनारपट्टीवर आल्यावर तेथील नौका ताब्यात घेतली, नावाड्याने गेट वे ऑफ इंडिया' जवळ आणून सोडल्यावर त्याला गोळी बालून मारले आणि दहशतवादी ताज हॉटेलात शिरले. काही दहशतवादी 'हॉटेल ओबेरॉय' च्या दिशेने गेले आणि अंधाधुंद गोळीबार सुरु झाला; पण त्याच वेळी मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट चालू होता. करकरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामा हॉस्पिटल कडे जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. आदेशाचे तंतोतंत पालन करत करकरे, विजय साळसकर, कामटे इत्यादी मंडळी कामा हॉस्पिटलकडे निघाली. कामा हॉस्पिटलच्या परिसर...
मिसाईल मॅन-अब्दुल कलाम अबुल पाकिर जैनुलबदीन अब्दुल कलाम असे लांबलचक नाव असलेले भारताचे मिसाईल मॅन-अब्दुल कलाम कलाम यांची 15 ऑक्टोबर 2023 रोजी 92 वी जयंती साजरी होते आहे.खरंच एका सर्वसामान्य तमिळी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाने भारतीय विज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात जी अद्वितीय कामगिरी केली आहे त्याला जोड नाही.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कलाम यांनी भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती पद भूषविले. भारतीय क्षेपणास्त्र क्षेत्रात स्वावलंबी बनवले. 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर म या छोट्याशा समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या गावात तमिळी मुस्लिम कुटुंबात झाला.याच मातीत ते सर्वधर्मसमभाव शिकले . रामनाथशास्त्री, अरविंदम,शिवप्रकाशन या बालपणीच्या मित्रांसमवेत भेदभावविरहित जीवन जगले.येथेच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाम यांनी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी रामनाथपुरम येथील श्वार्झ विद्यालयात प्रवेश घेतला . तेथे त्यांना नव्या शाळेत नवे पंख फुटल्यासारखे वाटू लागले...
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ *... रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून सरकारी शाळांना दहा लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप* *___रश्मीज् स्माईल ट्रस्टचे योगदान *आपल्या राज्यातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र नगरीत राधानगरी, करवीर,कागल, भुदरगड तालुक्यातील अनेक शाळांना रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून स्मार्टबोर्ड, कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, फुटबॉल, रिंगा, स्किपिंग रोप्स, बॅडमिंटन रॅकेट, स्कूल बॅग्ज, वह्या, प्रयोगशाळा साहित्य, सॅनिटरी पॅड्, कलरबॉक्स असे विविध प्रकारचे पंचवीस लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य गेल्या तीन-चार वर्षांत मिळाले आहे.याकामी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विकास पोतदार, सेक्रेटरी डॉ भावना कुचेरिया, प्रोजेक्ट ॲड्व्हायझर, डॉ सुहास कुचेरिया, प्रोजेक्ट इन्चार्ज मा.सोहिल शाह या आणि इतर मान्यवर मंडळींनी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद* *२५ सप्टेंबर २०२३रोजी राधानगरी तालुक्यातील अठरा शाळांना आणि करवीर व कागल शाळेतील प्रत्येकी एका शाळेला रश्मीज् स्माईल ट्रस्ट, मुंबई यांच्या मार्फत सुमारे...
Comments
Post a Comment