महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना हसन मुश्रीफ यांनी ऐतिहासिक स्थळांची दुरूस्ती, सुशोभीकरण करण्यासाठी नुकताच भरघोस निधी मंजूर केला आहे.त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.ऐतिहासिक स्थळांची डागडुजी झालीच पाहिजे.आपला तो ऐतिहासिक वारसा आहे.तो जपलाच पाहिजे. पण गड किल्ले किंवा ऐतिहासिक कोणत्याही वास्तू यांची डागडुजी करण्यासाठी इतिहास संशोधक यांचा किमान एकदा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे. ना.हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी निधी मंजूर केला आहे,ही बाब अभिमानास्पद आहेच.पण विशाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी दीड कोटीच्या वर निधी मंजूर केला आहे,याचे आश्चर्य वाटले. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाला जाताना त्यांना सहाशे बांधवांनी संरक्षण दिले होते. वाटेत घोडखिंडीत सिद्दी मसूदचे सैन्य महाराजांच्या अगदी जवळ आल्यावर बांदलांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले.रायाजी बांदल या तरुण सरदारांच्या नेतृत्वाखाली तीनशे मावळ्यांची एक तुकडी घोडखिंडीत थांबली आणि महाराजांच्या बरोबर त...
उद्या असणाऱ्या गौतम बुद्ध जयंतीनिमित्त लेख.. *जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज!* ----------------------------- -डॉ.श्रीमंत कोकाटे ----------------------------- तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ईसपू. 563 साली लुम्बिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुध्दोदन तर आईचे नाव महामाया होते. मातेचे सातव्या दिवशी निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी तथा सावत्र माता गौतमीने अत्यंत प्रेमाने केला. बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. *अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय*. तसेच त्यांना *भगवा* या नावानेदेखील ओळखले जात असे. भगवा म्हणजे महान. भगवा हा पाली भाषेतील शब्द आहे. कारुण्य आणि प्रेम यांनी त्यांचे व्यक्तिमत्व ओतप्रोत भरले होते. सिद्धार्थला त...
.....*राष्ट्रीय क्रीडा दिन*....... ...... मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.मेजर ध्यानचंद हे हॉकी खेळातील वादळ होते.१९२८,१९३२, आणि १९३६ या सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताने सुवर्ण पदक पटकाविले ते मेजर ध्यानचंद यांच्या जादूमय खेळामुळे .मेजर.ध्यानचंद यांच्या जादूमय खेळाची जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष हिटलर यांनाही भूरळ पडली होती . त्यांनी ध्यानचंदन यांना सैन्यात मोठं पद देऊ केले होते.त्याचबरोबर जर्मनीच्या संघातून खेळण्यासाठी ऑफर दिली होती पण ती ऑफर ध्यानचंदन यांनी नाकारली.मी भारताचे मीठ खाल्लं आहे.भारतातर्फेच खेळणार आहे असे ठणकावून सांगितले होते.राष्ट्रभक्ती आणि खेळ या दोन्ही गोष्टी ध्यानचंदकडे होत्या.म्हणूनच ते अजरामर आहेत. आपण मुलांना शाळेत आणि घरी सुद्धा खेळण्यासाठी पुरेसा वेळ देतो का? मुलांनी भरपूर खेळले पाहिजे आणि भरपूर अभ्यासही केला पाहिजे.आजकाल एकुलत्या एक मुलांचे पालक हेच त्या मुलांची समस्या बनत आहेत.आजकालची मुलं खूप दमवतात.ती खूप चिडचिडी आहेत.आदळआपट करतात.शांत बसत नाहीत.वगैरे अनेक तक्रारी पालक सांगत अ...
Comments
Post a Comment