महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना हसन मुश्रीफ यांनी ऐतिहासिक स्थळांची दुरूस्ती, सुशोभीकरण करण्यासाठी नुकताच भरघोस निधी मंजूर केला आहे.त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.ऐतिहासिक स्थळांची डागडुजी झालीच पाहिजे.आपला तो ऐतिहासिक वारसा आहे.तो जपलाच पाहिजे. पण गड किल्ले किंवा ऐतिहासिक कोणत्याही वास्तू यांची डागडुजी करण्यासाठी इतिहास संशोधक यांचा किमान एकदा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे. ना.हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी निधी मंजूर केला आहे,ही बाब अभिमानास्पद आहेच.पण विशाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी दीड कोटीच्या वर निधी मंजूर केला आहे,याचे आश्चर्य वाटले. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाला जाताना त्यांना सहाशे बांधवांनी संरक्षण दिले होते. वाटेत घोडखिंडीत सिद्दी मसूदचे सैन्य महाराजांच्या अगदी जवळ आल्यावर बांदलांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले.रायाजी बांदल या तरुण सरदारांच्या नेतृत्वाखाली तीनशे मावळ्यांची एक तुकडी घोडखिंडीत थांबली आणि महाराजांच्या बरोबर त...
संविधान दिन 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11महिने 18 दिवस लागले.9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते.कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या.यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे सचिव होते.डॉ.बी.एन.राव हे कायदेविषयक सल्लागार होते. याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू,नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,सरोजिनी नायडू अशा अनेक नामवंत बॅरिस्टर दर्जाच्या व्यक्ती संविधान सभेत सदस्य होत्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर्वांच्या विचारविनिमयातून संविधान तयार झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाला कायदेविषयक कलमात बंदिस्त केले.संविधान सभेच्या अनेक बैठका झाल्या.दुरुस्त्यांसह 26 न...
*____________________🖋️* श्रीकृष्ण जन्माष्टमी महान तत्त्वज्ञ, बहुजन समाजाचा प्रतिनिधी, आपल्या कर्तृत्वाने ज्यांना तमाम भारतीयांनी दैवत्व बहाल करून आपल्या हृदयात आणि देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला.श्रीकृष्णाचे आयुष्य दोन युगांच्या जोडणीत गेले.साधारणत:एक युग म्हणजे ४ लाख ३२हजार वर्षे मानले जाते.कलियुग संपायला अजून ४ लाख २७ हजार वर्षे बाकी आहेत. श्रीकृष्णाचा जन्म झाला द्वापारयुगात आणि मृत्यू झाला तो कलियुगात. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि शंख वाजवून महाभारत युदृधाची (कौरव पांडव युद्ध)सुरूवात केली.तेथूनच कलियुगाची सुरूवात झाली.म्हणूनच श्रीकृष्णाला युगप्रवर्तक म्हटले जाते. श्रीकृष्णाचा मामा कंस याला कोणीतरी ज्योतिष्याने सांगितले की तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्रापासून तुझा वध होईल.आपला मृत्यू टाळण्यासाठी कंसाने श्रीकृष्णाच...
Comments
Post a Comment