. तुलशी विवाह - एक अनिष्ट प्रथा. परंपरा, संस्कृती, उत्सव, प्रथा या गोष्टी भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. यातून आनंद मिळतो, सांस्कृतिक वारसा मिळतो. हे जरी खरे असले, तरी काही प्रथांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. काही प्रथा,परंपरा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आपण जपत आलो आहोत. पण काही विकृत ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या असलेल्या परंपरा आपण जोपासत असेल ,तर मात्र आपण आपली सद्सदविवेकबुद्धी कुठेतरी गहाण ठेवली आहे, असेच म्हणावे लागेल, अशीच एक परंपरा आपण डोळ्यांवर पट्टी बांधून हजारो वर्षापासून चालवत आलो आहोत. आणि ती परंपरा म्हणजे 'तुलसी विवाह 'होय. , या तुलसी विवाहाबाबतच आपण माहिती घेणार आहोत. भारताच्या सप्तसिंधु प्रदेशात बळी वंशातील पराक्रमी राजांचे राज्य होते. त्यांनी हजारो वर्षापासून आर्यांशी म्हणजे वैदिक संस्कृतीशी संघर्ष केला आणि आपली मूल भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बंळीवंशात हिरण्याक्ष, हिरण्यक, हिरण्यकशिपू प्रल्हाद, विरोचन, कपिल, बळी, बाणासूर असे एकापेक्षा एक पराक्रमी आणि शीलवान रा...
*संभाजी पाटील सर म्हणचे ,बहुजन समाजाने आचरणात आणावयाच्या मूल्यांचा ठेवा* [( *संभाजी पाटील सरांनी आयुष्यभर ह्रदय ओतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व संवर्धन आणि समाजाचे ऐश्वर्यवर्धन केले आहे*)] ({ *संभाजी पाटील सर खळाळ म्हणजे उत्साहाचा खळाळून वाहणारा निर्झर. सर म्हणजे जिवंतपणा , सळसळते चैतन्य,नित्य नवीनता व रमणीयताही*)} (( *समर्पित भावनेने सेवा बजावणारा हरहुन्नरी शिक्षक, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून देणारा बाप माणूस, क्रीडांगणावर अंगात चैतन्य संचारते असा स्पोर्ट्समन, सृजनशील व संवेदनशील लेखक, इंग्रजी -गणित- बुद्धिमत्ता - मराठी वाड्:मय यावर जबरदस्त प्रभुत्व असणारा माणूस व समाजमुख प्रशासन असणारे सतेज ,सदानंदी व सदाबहार मुख्याध्यापक म्हणजे संभाजी पाटील*)) [[ *१९८४ पासून शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यापदावर काम करत असताना मी तांदळे गुरुजी ( कन्या मलकापूर), साळोखे गुरुजी ( केंद्र शाळा माण) सदानंद कदम ( भोसे सांगली) गंगामाई विद्यालय खाजगी प्राथमिक शाळा इचलकरंजी मुख्याध्यापिका दामले मॅडम , वसंत भोसले (पद्माराजे शाळा कोल्हापूर मनपा ) व ...
*____________________🖋️* श्रीकृष्ण जन्माष्टमी महान तत्त्वज्ञ, बहुजन समाजाचा प्रतिनिधी, आपल्या कर्तृत्वाने ज्यांना तमाम भारतीयांनी दैवत्व बहाल करून आपल्या हृदयात आणि देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला.श्रीकृष्णाचे आयुष्य दोन युगांच्या जोडणीत गेले.साधारणत:एक युग म्हणजे ४ लाख ३२हजार वर्षे मानले जाते.कलियुग संपायला अजून ४ लाख २७ हजार वर्षे बाकी आहेत. श्रीकृष्णाचा जन्म झाला द्वापारयुगात आणि मृत्यू झाला तो कलियुगात. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि शंख वाजवून महाभारत युदृधाची (कौरव पांडव युद्ध)सुरूवात केली.तेथूनच कलियुगाची सुरूवात झाली.म्हणूनच श्रीकृष्णाला युगप्रवर्तक म्हटले जाते. श्रीकृष्णाचा मामा कंस याला कोणीतरी ज्योतिष्याने सांगितले की तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्रापासून तुझा वध होईल.आपला मृत्यू टाळण्यासाठी कंसाने श्रीकृष्णाच...
Comments
Post a Comment