....... *हेमंत करकरे - खरा देशभक्त* २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) हेमंत करकरे यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते. पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी मुंबई समुद्रकिनारपट्टीवर आल्यावर तेथील नौका ताब्यात घेतली, नावाड्याने गेट वे ऑफ इंडिया' जवळ आणून सोडल्यावर त्याला गोळी बालून मारले आणि दहशतवादी ताज हॉटेलात शिरले. काही दहशतवादी 'हॉटेल ओबेरॉय' च्या दिशेने गेले आणि अंधाधुंद गोळीबार सुरु झाला; पण त्याच वेळी मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट चालू होता. करकरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामा हॉस्पिटल कडे जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. आदेशाचे तंतोतंत पालन करत करकरे, विजय साळसकर, कामटे इत्यादी मंडळी कामा हॉस्पिटलकडे निघाली. कामा हॉस्पिटलच्या परिसर...
मिसाईल मॅन-अब्दुल कलाम अबुल पाकिर जैनुलबदीन अब्दुल कलाम असे लांबलचक नाव असलेले भारताचे मिसाईल मॅन-अब्दुल कलाम कलाम यांची 15 ऑक्टोबर 2023 रोजी 92 वी जयंती साजरी होते आहे.खरंच एका सर्वसामान्य तमिळी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाने भारतीय विज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात जी अद्वितीय कामगिरी केली आहे त्याला जोड नाही.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कलाम यांनी भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती पद भूषविले. भारतीय क्षेपणास्त्र क्षेत्रात स्वावलंबी बनवले. 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर म या छोट्याशा समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या गावात तमिळी मुस्लिम कुटुंबात झाला.याच मातीत ते सर्वधर्मसमभाव शिकले . रामनाथशास्त्री, अरविंदम,शिवप्रकाशन या बालपणीच्या मित्रांसमवेत भेदभावविरहित जीवन जगले.येथेच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाम यांनी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी रामनाथपुरम येथील श्वार्झ विद्यालयात प्रवेश घेतला . तेथे त्यांना नव्या शाळेत नवे पंख फुटल्यासारखे वाटू लागले...
*____________________🖋️* श्रीकृष्ण जन्माष्टमी महान तत्त्वज्ञ, बहुजन समाजाचा प्रतिनिधी, आपल्या कर्तृत्वाने ज्यांना तमाम भारतीयांनी दैवत्व बहाल करून आपल्या हृदयात आणि देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला.श्रीकृष्णाचे आयुष्य दोन युगांच्या जोडणीत गेले.साधारणत:एक युग म्हणजे ४ लाख ३२हजार वर्षे मानले जाते.कलियुग संपायला अजून ४ लाख २७ हजार वर्षे बाकी आहेत. श्रीकृष्णाचा जन्म झाला द्वापारयुगात आणि मृत्यू झाला तो कलियुगात. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि शंख वाजवून महाभारत युदृधाची (कौरव पांडव युद्ध)सुरूवात केली.तेथूनच कलियुगाची सुरूवात झाली.म्हणूनच श्रीकृष्णाला युगप्रवर्तक म्हटले जाते. श्रीकृष्णाचा मामा कंस याला कोणीतरी ज्योतिष्याने सांगितले की तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्रापासून तुझा वध होईल.आपला मृत्यू टाळण्यासाठी कंसाने श्रीकृष्णाच...
Welcome to the world of Boggers.....
ReplyDeleteThanks.I hope you will always visit to my scholarship blog.
Delete