Posts

Showing posts from October, 2023

ऐतिहासिक स्थळे आणि सुशोभीकरण

   महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना हसन मुश्रीफ यांनी ऐतिहासिक स्थळांची दुरूस्ती, सुशोभीकरण करण्यासाठी नुकताच भरघोस निधी मंजूर केला आहे.त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.ऐतिहासिक स्थळांची डागडुजी झालीच पाहिजे.आपला तो ऐतिहासिक वारसा आहे.तो जपलाच पाहिजे. पण गड किल्ले किंवा ऐतिहासिक कोणत्याही वास्तू यांची डागडुजी करण्यासाठी इतिहास संशोधक यांचा किमान एकदा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे.      ना.हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी निधी मंजूर केला आहे,ही बाब अभिमानास्पद आहेच.पण विशाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी दीड कोटीच्या वर निधी मंजूर केला आहे,याचे आश्चर्य वाटले. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाला जाताना त्यांना सहाशे बांधवांनी संरक्षण दिले होते. वाटेत घोडखिंडीत सिद्दी मसूदचे सैन्य महाराजांच्या अगदी जवळ आल्यावर बांदलांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले.रायाजी बांदल या तरुण सरदारांच्या नेतृत्वाखाली तीनशे मावळ्यांची एक तुकडी घोडखिंडीत थांबली आणि महाराजांच्या बरोबर त...

मिसाईल मॅन-अब्दुल कलाम

    मिसाईल मॅन-अब्दुल कलाम     अबुल पाकिर जैनुलबदीन अब्दुल कलाम असे लांबलचक नाव असलेले भारताचे मिसाईल मॅन-अब्दुल कलाम कलाम यांची 15 ऑक्टोबर 2023 रोजी 92 वी जयंती साजरी होते आहे.खरंच एका सर्वसामान्य तमिळी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाने भारतीय विज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात जी अद्वितीय कामगिरी केली आहे त्याला जोड नाही.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कलाम यांनी भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती पद भूषविले. भारतीय क्षेपणास्त्र क्षेत्रात स्वावलंबी बनवले‌.       15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर म या छोट्याशा समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या गावात तमिळी मुस्लिम कुटुंबात झाला.याच मातीत ते सर्वधर्मसमभाव शिकले . रामनाथशास्त्री, अरविंदम,शिवप्रकाशन या बालपणीच्या मित्रांसमवेत भेदभावविरहित जीवन जगले.येथेच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले..             प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाम यांनी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी रामनाथपुरम येथील श्वार्झ विद्यालयात प्रवेश घेतला . तेथे त्यांना नव्या शाळेत नवे पंख फुटल्यासारखे वाटू लागले...

बुद्ध बुद्धू,थेर-थेरडा

 *बुद्ध-बुद्धू,थेर-थेरडा* प्राचीन पाली भाषेतून आलेले बुद्ध आणि थेर असे अनेक शब्द मराठीसह अनेक भाषांमध्ये स्थिर झाले आहेत.खरं तर बुद्ध म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे असा तो आणि थेर म्हणजे कुटुंबातील वयस्क व्यक्ती, वृद्ध या अर्थाने पाली भाषेत वापरले जात.बुद्धांच्या आणि त्यानंतर सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर बुद्धाचा द्वेष करणारी मंडळी हळूहळू डोके वर काढू लागली.अर्थातच पाली भाषेचाही द्वेष करू लागली.पाली भाषेतील गौरवशाली शब्दांचे हळूहळू विकृतीकरण करण्यात वैदिक परंपरेतील लेखक(ब्राह्मण्यवादी) यशस्वी झाले. त्यातूनच थेरडा,थेरडी,बुद्धू असे शब्द समाजात रूढ केले. अंबाबाई-महालक्ष्मी,बलिमंदिर-वामन मंदिर...       कोल्हापूरच्या अंबाबाईचेच उदाहरण घ्या ना.हळूहळू महालक्ष्मीकरण करण्याचे काम सुरूच आहे.मध्यंतरी कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीने महालक्ष्मी मंदिर असा शब्द वापरायला हरकत घेतली.अंबाबाई मंदिर असाच शब्द वापरण्यास सांगितले. त्यामुळे अंबाबाई मंदिर असेच वर्तमान पत्रात येते.महालक्ष्मी ही वैदिकांची देवी आहे आणि अंबाबाई ही अवैदिकांची आहे.            अशा...

वाघनख्या आणि राजकारण

             वाघनख्या आणि राजकारण        छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे अनेक अंगांनी प्रेरणादायी असेच होते.सुमारे चारशे वर्षांपूर्वी राज्यसत्ता या धर्मभेदावर आधारित विभाजलेल्या नव्हत्या; तर प्रत्येक राज्यसत्ता आपली पारंपरिक गादी सांभाळण्यात, वाचवण्यात आणि वाढवण्यात गुंतलेली होती.अशा परिस्थितीत स्वबळावर नवीन राज्यसत्ता निर्माण करण्याची किमया छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली होती.अत्यंत कल्पक, दूरदृष्टीता असलेला,रयतेचे राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने ध्येयवेडा झालेला आणि महापराक्रमी असा हा राजा १६३० ते १६८० या कालावधीत होऊन गेला.           छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र जसे विविध गुणांनी भरलेले आहे,तसे ते अस्सल पराक्रमाने भरभरून गेले आहे.त्यांतीलच एक सर्वत्र गाजत असलेला प्रसंग म्हणजे 'अफजलखानाचा वध'. महाराजांनी आपल्या एका पेक्षा एक अशा पराक्रमाने आणि गनिमी काव्याने अगदी तुटपुंज्या सैन्यांसह एका पाठोपाठ एक लढाया जिंकल्या होत्या.त्याचे हादरे विजापूरच्या आदिलशहाला बसत होते.म्हणूनच शिवरायांचा बंदोबस्त ...