Posts

मला लाभलेलं अनोखं पितृछत्र

 *मला लाभलेलं अनोखं पितृछत्र*          "काय अंगणवाडी सेविका का ?" आमच्या नात्यातील पहिले वाक्य --- मी हसूनच उत्तर दिले. नाही, प्राथमिक शिक्षिका. मनात विचार आला कोण आहे ही व्यक्ती असे अचानक येऊन मला असे विचारले ते. काही वेळाने उत्तर मिळाले केंद्र शाळा वलवण दाजीपूर मध्ये नवीन शिक्षक हजर झालेत. श्री संभाजी गोविंद पाटील.  आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. किंवा आपल्या ला हवीहवीशी असणारी सगळीच लोक आपल्या सोबत राहत नाहीत, म्हणून आपण देवावर खूप नाराज असतो, जशी की मी, इयत्ता 6 वी मध्ये असताना माझे वडिल मला सोडून गेले. पण एकत्र कुटुंबपद्धती असल्याने माझे चुलते श्री रामराव विष्णु पोवार यांनी मला ती पोकळी कधी जानवू दिली नाही, पण नियतीला तेही मान्य नव्हते व 19 जानेवारी 2014 साली मध्ये ते पण मला सोडून अचानक गेले. त्यानंतर मी देवावर पुर्णत: रागातच होते. पण देव कधीच कुणावर इतका अन्याय करत नाही. आणि त्याने लगेचच 2015 मध्ये माझ्या आयुष्यात पाठवले ते म्हणजे श्री संभाजी पाटील सर. माझ्या आयुष्यातली पोकळी भरुन काढण्यासाठी. आपण कोणत्याच व्यक्तीशी क...

मैत्रीचा ओलावा

 *मैत्रीचा ओलावा*.                              एक प्राथमिक शाळेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला अध्यापक , इंग्रजीवर प्रभुत्व असलेला हाडाचा पदवीधर शिक्षक , स्कॉलर ते विविध विषयांवर पुस्तकाचे लेखन करणारा उत्कृष्ट लेखक , एम. आर. देसाई पत संस्थेचा संचालक - चेअरमन - एक नेता ते शिक्षक बॅकेचा संचालक ,जिल्हा परिषद आदर्श शिक्षक ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक अशी यशाची उत्तुंग भरारी घेणारा *माझा जिवलग मित्र श्री . संभाजी पाटील* यांच्या सेवा निवृत्ती निमित्त त्यांच्या संबंधातील आठवणींना उजाळा म्हणून थोडं लिहावे वाटले म्हणून .....                श्री.संभाजी पाटील व मी प्राथमिक शाळेपासूनच एकमेकांचे मित्र होतो . माझ्या पेक्षा एक वर्षानी तो पुढच्या वर्गात होता . मला आठवतंय की, सातवीला श्री.सि.धो.पाटील गुरूजी त्यांच्या वर्गावर वर्ग शिक्षक होते . तेव्हा गुरुजीचा  मुलगा यशवंत पाटील व पुतण्या रमेश पाटील हे सुळंबीहून  सावर्डेच्या शाळेत शिकण्यास यायचे; श्री संभाजी पाटील ...

माझ्या प्रवासातील सोबती

 ......................   *माझ्या प्रवासातील सोबती*          माझे आईवडील शेतकरी कुटुंबातील,कष्टाळू, समाजप्रिय आणि प्रामाणिक असे लाभल्यामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी बालपणीच या गोष्टींचा प्रभाव पडला होता.माझ्या कष्टाळू वडिलांनी आपल्या नऊ मुलांबरोबरच भावकीतील मुलांचेही संगोपन केले.उसाच्या घाण्यावर chief chemist (मुख्य गुळव्या) असलेल्या माझ्या बाबांचा सहवास मला अल्पकाळ लाभला. मी त्यांचा लाडका होतो.भल्या पहाटे नदीला, विहिरीला अंघोळीला सहा जण भावांपैकी मी एकटाच बाबांबरोबर कितीतरी वेळ गेलो आहे.बाबांची गावात आणि पंचक्रोशीत एक दयाळू व्यक्ती म्हणून ओळख होती . पंचक्रोशीतील मुलं गूळ खाण्यासाठी आमच्या घाण्यावर यायचे.          मी इयत्ता सातवीत असताना वडिलांचे छत्र हरपले आणि आमची सगळी जबाबदारी आईवर येऊन ठेपली.वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे माझी आई डगमगली नाही.खंबीरपणे मुलांना सांभाळले.आम्ही भाऊ-भाऊ लहानपणी मित्रांसारखं एकत्र राहिलो.माझी आई बुद्धिमान होती."पहिली-दुसरीत माझा पहिला नंबर आला होता"असं अभिमानाने आई मला सांगायची. आणि हा पहिला नंब...

गुरूचे स्थान

 ____________________   *गुरूचे स्थान*🖋️ गुरूचे स्थान हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे असते.जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस शिकत असतो.आपल्याला  चांगले घडवण्यासाठी गुरू महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.आईवडील आपले पहिले गुरू असतात;तर शाळेत प्रवेश केल्यानंतर मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम जे करतात, ते आपल्या जीवनातील दुसरे गुरू होय.        आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला खूप महत्त्वाचे स्थान आहे.शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत,तर ते त्यांना व्यावहारिक आणि आध्यात्मिक ज्ञान सुद्धा देतात.असेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री संभाजी पाटील हे सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आहेत. ते दयाळू आहेत,प्रेमळ आहेत, कणखर भूमिका घेणारे आहेत आणि आमच्या शाळेचे चैतन्य आहेत. आजच्या जमान्यात अशी व्यक्ती भेटणे अशक्य आहे असे मला वाटते.कारण ते शिकवत असो की मैदानावर खेळ खेळत असो, तरूणांना सुध्दा लाजवेल असा उत्साह त्यांच्या ठिकाणी आहे.        आमचे मुख्याध्यापक सकाळी शाळेत आले,की अगोदर ...

माझ्या जीवनातील अवलिया

 _________________________   *माझ्या जीवनातील अवलिया*🖋️🖋️          सरांची आणि माझी ओळख आमच्या साईसमृद्धी मल्टी पर्पज हाॅलला कार्यक्रमाच्या बुकिंग दरम्यान झाली. पण गेल्या जन्मातले काहीतरी नाते असल्यासारखे सरांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी माझे ऋणानुबंध जुळले आहेत. तसं पहायला गेले तर सरांचं कर्तृत्व इतके महान आहे, की ते शब्दात पण सांगता येणार नाही. सर माझ्या प्रेरणास्थानी आहेत आणि याचा मला खूप अभिमान आहे. ते खूप तत्त्वनिष्ठ आहेत. तत्त्वाशी तडजोड कधीच करत नाहीत. आपल्या कामाचा कधीच डामडौल करत नाहीत. प्रत्येक काम झोकून देऊन करतात. सरांच्या कडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या .जसे इच्छा असेल तर कुठलीच गोष्ट अवघड नसते,तुझा स्वप्नभंग झाला तरी तुझी मुले उदिष्टपूर्ती नक्की करतील, इर्षा करावी पण निखळ करावी, तसेच मी माझा बिझनेस करत असतानी खूप भावनिक  होत होते .तर सरांनी एकदा मला सांगितले की व्यापार आणि व्यवसाय करताना भावनांना महत्त्व द्यायचे नाही.           सरांची रहाणी साधी आहे; पण विचारसरणी उच्च आहे.        ...

आधारवड

 ________&_________🖋️      *आधारवड*          विद्या मंदिर तिटवे शाळेत  मुख्याध्यापक म्हणून झंझावाती कारकीर्द केलेले आणि सेवेच्या अंतिम टप्प्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री संभाजी पाटील यांच्या सेवेची सुरूवात चांदे ता राधानगरी येथून झाली.तेथून ते सोळांकूर,पंडेवाडी, सावर्डे पाटणकर या गावात अध्यापक म्हणून,तर बुजवडे , उंदरवाडी येथे पदवीधर अध्यापक म्हणून काम केले.केंद्र शाळा दाजीपूर येथे पदवीधर अध्यापक तथा केंद्र मुख्याध्यापक अशी दोन्ही पदे सक्षमपणे सांभाळली .तर मुख्याध्यापक म्हणून विद्या मंदिर तिटवे शाळेत पाच वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द यशस्वीपणे पार पाडली. त्यांना या यशस्वी कारकीर्दीत जिल्हा परिषद कोल्हापूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला;तर शिक्षकांना मिळणारा भारत सरकारचा सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार २०१६ साली मिळाला.           राधानगरी, भुदरगड,कागल हे तिन्ही तालुके महाराष्ट्रात अग्रस्थानी आहेत.या यशात संभाजी पाटील यांच्यासारख्या कितीतरी शिक्षकांनी योगदान दिले ...

ताठ कण्याचा मुख्याध्यापक

 __________________🖋️ *..ताठ कण्याचा मुख्याध्यापक*            राधानगरीला गटशिक्षणाधिकारी पदावर हजर झाल्यानंतर अनेक शाळा, शिक्षक, संघटना, लोकप्रतिनिधी इत्यादी विविध स्तरातील व्यक्तींशी शैक्षणिक प्रशासनाच्या अनुषंगाने संपर्क आला.राधानगरी तालुका शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे यापूर्वी वाचले होते.इथले शिक्षक, संघटना प्रमुख, लोकप्रतिनिधी,पालक, ग्रामस्थ, पत्रकार इत्यादी सगळेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी व स्पर्धात्मक क्षेत्रात तालुक्याचा नावलौकिक टिकवण्यासाठी आग्रही असून त्यासाठी काम करताना दिसतात.तालुक्यात २०५ जिल्हा परिषद शाळा असून त्यांमधील ४६ शाळांना पात्र मुख्याध्यापक शाळा आहेत.यांमध्ये राधानगरीच्या पूर्वेला असलेल्या विद्या मंदिर तिटवे शाळेचा समावेश होतो.              तिटवे गावातील जिल्हा परिषद शाळेचा पट २००पेक्षा जास्त असल्याने या शाळेला पात्र मुख्याध्यापक पद मंजूर आहे.शैक्षणिक विश्वात असं म्हटलं जातं की,जसे मुख्याध्यापक तशी शाळा.त्यामुळे शाळेच्या प्रशासनात आणि गुणवत्तापूर्ण कामात मुख्याध्यापक हा...